गुरुवार, ३० जून, २०२२

१ ते ७ जुलै वन महोत्सव ( वन सप्ताह )

  जागवा अपुले अंतर्मन !जगण्यासाठी हवे वनसंवर्धन !


         *वन संरक्षण आणि वनसंवर्धनाचे महत्व पटवणारा सप्ताह .

         *प्रत्येकाने  एक तरी झाड लावावे आणि सांभाळावे हि अपेक्षा .

   पार्श्वभूमी

              भारतीय संस्कृतीमध्ये  माणूस आणि जंगल यामधील द्रुढ नाते नाना प्रकारे सांगितले गेले आहे.परंतु गेल्या काही दशकात आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे .हि जाणीव व्हावी आणि हि परिश्तिती सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून केला जावा यासाठी वन महोत्सवामधून प्रोत्साहनदिले जाते .

मूळ संकल्पना व सुरुवात 

       भारतात १९५० साली के. एम .मुन्शी यांच्या  पुढाकाराने  वनमहोत्सव सुरु झाला .ते त्यावेळी केंद्र सरकारमध्ये अन्न आणि कृषी मंत्री होते .

त्यावेळी भारतात जंगल क्षेत्र भरपूर होते परंतु कदाचित पुढील गरजा आणि धोका ओळखून ,जंगलाच्या संरक्षणासाठी, त्यांनी वनमहोत्सवाला चालना दिली .कारण शहरीकरण आणि औधोगीकरण हवे असेल तर वाटेतली झाडे तोडली पाहिजेत असे ( चुकीचे  ) समीकरण मूळ धरू लागले होते .

 

महत्वआणि गरज 

      खरे तर जंगलापासून फक्त मानवालाच नाही ;तर संपुर्णसजीव -निर्जीव सृष्टीला अनेक फायदे होतात .हवामानाचे संतुलन ,नियमित पाऊस,शुद्धहवा वळवण्टीकरणापासून उद्भवणाऱ्या समस्या दूर करणे ,पशुपाक्षानायोग्य अधिवास देणे  ( राहण्याची जागा  )जमिनीची धूप तसेच पाण्याचे आक्रमण थोपवणे  हे फायदे तर होतातच शिवाय आपल्याला लाकूड आणि इतर वन संपती मिळते ती वेगळीच !  पण आपली चूक इथेच होत आहे .माणसाच्या हावरटपणामुळे तात्पुरत्या फायद्यासाठी  मनुष्य जंगलाची तोड  करत  चाललो आहोत .

 आपण काय करावे .

 *वर्षाच्या सुरवातीपासून केलेल्या वृक्षरोपणाचा आढावा घ्यावा .

  *या सप्ताहात गावातील शेतांच्या बांधावर झाडे  प्रत्येकाने पुढाकार घ्यावा .

  *गावाच्या देवस्थानासाठी देवराई सारखा प्रकल्प तयार करून त्याला              गावातील प्रत्येक वेक्तीने सहभाग घेऊन झाडे लावण्यास मदत करावी .

  *या सप्ताहात गावकऱ्यांनी कोण कोणती झाडे कशा पद्धतीने लावावीत          याबद्दल एक मेकांना मार्गदर्शन करावे .

  *झाडे लावण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत .

   *या निमिताने गावाच्या परिसरातील स्थानिक झाडाची माहिती संकलित                    करावी . 

   *गावात कुऱ्हाड बंदिसारखा निर्णय करता येईल का यावर                              चर्चा,विचारविनिमय  करावा .

जड -पत्तो से औषधी ,पुष्पो से स्वागत -सन्मान ,

पेडो का हर एक हिस्सा, आता हेए  मनुष्य के काम !

बुधवार, २९ जून, २०२२

पर्यावरणाचे राजदूत !

!  पर्यावरणाचे राजदूत !



आज आपण या पेज वर  पर्यावरणाचे  राजदूत कोण आहेत आणि त्यांचा पर्यावरणाशी  कसा कोणता  आणि काय  संबध या विषयी  माहिती घेणार आहोत .आपण यांना राजदूत का मानतो  आणि ते का त्यांचे आजचे महत्व काय . आणि त्यांची ओळख या ब्लोग मार्फत  करून घेणार आहोत .हे सर्व  सजीव जीव रोज आपण पाहतो  आणि त्यांच्या सोबत आपला रोज सहवास  लाभतो .चला तर त्यांची ओळख करूया ...

राज्यप्राणी : शेकरू 



      शेकरू हि खारीची एक  प्रजाती  असून  महारास्त्रामध्ये  ती प्रामुख्याने भीमाशंकर ,वासोटा ,माहुली व फणसाडच्या डोंगरात आढळते .फळे आणि मधुरस हे त्याचे खाद्य आहे .त्याचे  शास्त्रीय नाव रटूफा इंडीका असे असून  इंग्लिशमध्ये याला  इंडियन जायंट स्कीरल असे  म्हणतात .


राज्यपक्षी : हरोळी



हरियाल किवा  हरोळी हा पक्षी कबूतराच्या वंशातील  आहे .याचे  शास्त्रीय नाव ट्रेरोन फोनिकॉप्टेरा असे असून त्याला  इंग्लिशमध्ये यलो फुटेड ग्रीन पिजन  म्हणतात .मराठीत याला हिरव्या रंगाचे कबुतर असेही म्हणतात .हा पक्षी आपणास गावातील पडीक घरे जुने वाडे वाडचे झाड किवा टेलेफोन तर मंदिरे येथे पहावयास मिळतात .


राज्यफळ: आंबा 



आंबा हे महाराष्ट्र राज्याचे वैशिष्टे पूर्ण  फळ असून  हापूस जातीच्या आंब्याची  जगभरात निर्यात केली जाते भारताचे हे राष्ट्रीय फळ आहे आणि भारत हा आंबा उत्पादनात जगात १ नंबर आहे . आणि भारतीय आंब्यांना  जगात खूप  मागणी आहे . कोकणातील आंब्यांना विशेष मागणी आहे .


राज्यफुल: जारुळ



      हे  फूल जारुळ बोंद्रा किंवा बुन्द्रा या नावाने  ओळखले जाते .त्याचा रंग लालसर जांभळा असतो .फेब्रुवारी -मार्च महिन्यात या झाडाला बहर येतो आणि एप्रिल ते जून या काळामध्ये हि फुले फुलतात .भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी हे झाड वाढते.ल्यागरस्त्रोमिया असे याचे  शास्त्रीय नाव आहे .


राज्य फुलपाखरू : ब्लुयू मॉरमॉन



   सर्वात मोठ्या आकाराचे सर्दन बर्डविंग हे फुलपाखरू दक्षिण भारतात आढळते .या फुलपाखराच्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये दिसणाऱ्या या फुलपाखराचा आकार मोठा आहे , पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात हे फुलपाखरू स्थलांतर करते .ते मखमली रंगाचे असून त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात .श्रीलंका ,भारतातील पश्चिम घाट,दक्षिण भारत आणि पूर्व समुद्र किनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळते .त्याला निलपरी असे म्हंटले जाते .खाण्याचे लिंबू  ,माकड लिंबू ,मेनका अशा वूक्षच्या पानावर या फुलपाखराची मादी अंडी घालते .अंड्यातून ठराविक दिवसांनी अळी बाहेर पडते .पाने खाऊन हि अळी मोठी होते .आणि तिचे फुलपाखरात रुपांतर  होते .राज्य फुलपाखरू जाहीर करणारे महाराष्ट्र हे  पहिलेच राज्य आहे .    

या प्रमाणे वरील राजदूत आपणास दिसले तर त्यांना अन्न आणि पाणी  दया आणि त्यांचे  रक्षण  करा .








८ जून जागतिक महासागर दिन

 सागरा  (चा ) प्राण तळमळला ..


       आजची महासागराची  काय अवस्था  हे आपल्याल्या सांगायची झाली तर जवळ जवळ 

* पृथ्वीचा ७५ टक्के हिसा व्यापणाऱ्या महासागराणा  पर्यावरणात महत्वाचे स्थान आहे .

*हजारो जलचरांचे  अधिवास  तर कोट्यावधी  मानवांचे अन्नदाते म्हणजे  महासागर '

*माणसाने केलेला कचरा  आणि प्रदूषण  याचा फटका महासागराना बसला आहे . 

*मानवाचे पाप धुण्याचे काम आजवर हा महासागर करत आहे .

महासागर हे कितीही  विशाल असले  तरी माणसाने केलेली किती  कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर मर्यादा आहे .आपण हि मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नासाखाल्याना  धक्का बसला आहे .यामुळे माणसाला मिळणारे  मासे तर कमी झाल्रे  आहेतच ; शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे .

मूळ संकल्पना व सुरवात 

समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्ये  कॅनडा ने   ,ब्राझिलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषेदेत मांडला .त्या;ला सयुक्त राष्ट्र  संघाने २००८ मध्ये मान्यता दिली .तेव्हा पासून ' द ओशन  प्रोजेक्ट ' या अमेरिकन  संस्थेच्या  सहक्र्याने  हा दिवस अंतर राष्ट्रीय  पातळीवर साजरा होऊ लागला . 

गैर समाज !   

सांडपाणी ,औधोगिक प्रदूषके  ,मुदत संपलेली  व घटक रसायने ,प्लास्टिक च्या बाटल्या .नि पिशव्या ...कचरा  कोणताही  असो ---'' फेका  समुद्रात  ! अहो कोवढआ मोठा आणि खोल  समुद्र , एवढ्याश्या  कचर्याने  काय होतय  .हि प्रथा जगभरातील  बहुतेक सर्वानीच पाळ ल्यामुळे आता मात्र परीशिती  गंभीर बनली आहे .मासे मिळवण्या साठी अधिकाधिक खोल समुदरात जावे  लागत आहे .पाण्याचा दर्जा घसरला आहे .हवामानावर  परिणाम होत आहे ,विशिष्ट  सजीव नष्ट होत आहेत ........

आपण काय  करावे  

*या दिवसी  मुलांना समुद्र काठी सहल घडवून आणल्यास चांगले .किवा  वर्षातून एकदा तरी समुद्राचे दर्शन होईल     असा कार्यक्रम आयोजित करावा .

*पृथ्वीचा ७५ टक्के  भाग पाण्याने म्हणजेच महासागराणी कसा व्यापला आहे हे मुलांना  इतरांना सांगून त्याबद्लची  अधिक माहिती देण्यात यावी .

*समुद्रात असलेल्या सजीवांची माहिती सर्वाना करून देणे .

*या सजीवांच्या  सरक्षाना  साठी समुद्र ,कचरा  व प्रदुषणं पासून लांब ठेवण्याची गरज काय याची माहिती  द्यावी .

*किनारपट्टीवरील  गावांनी आपापल्या गावाला असलेल्या समुद्र किनार्याची काळजी घेणे  तेथे  कचरा ,व प्रदूषण होणार नाही  या बदल येणाऱ्या पर्यटकांच्या जागुती करणे  काळजी घ्यावी .

*गावच्या किनारपटइ चे संरक्षण करण्याची जबाबदारी गावांनी स्वीकारणे .

जल हि जीवन हे !

*








मंगळवार, २८ जून, २०२२

वुक्ष संवर्धन दिन ‌‌(२३जुलै २०२१)


वुक्ष संवर्धन दिन . या दिवसा बद्दल सांगायचे झाले तर. वुक्ष हे आपल्या  रोजच्या  जीवनातील एक भाग  आहे .झाडे वाचून आपण एक दिवस पण राहू शकत नाही .झाडे हे  मानवासाठी एक कल्पवूक्ष  म्हणून काम करते .आपल्याला माहित असेल कि एक ५०पन्नस वर्षे  ज्जुने झाड किती  उपयोगी आहे 
     फक्त एक झाड  लावा ! कारण  कि  
१)३५  लाख  रुपयाच्या किमतीचे वायूचे प्रदूषण टाळते .
२)१५ लाख रुपय किमतीचे ओक्शिजन  उत्पादन .
३ )४० लाख रुपय किमतीचे पाण्याचे  रिसायकलिंग 
४ ) ३ किलो कार्बन चा एका वर्षात नाश  करते .
५ ) एक परिपूर्ण झाड १०० माणसाचे  जेवण शिजवून तयार करू शकते '
६ )२ अंशनी आसपासचे वातावरणातील  तापमान कमी  करू शकते .
७ )एका झाडापासून एका कुटंब  चे सर्व  साहित्य  तयार होते .
८ )१२ विध्यार्थी  च्या शिक्षणासाठी वह्या पुस्तके तयार करू शकते .
९ )झाड माणसाला लहानपणीच्या  पान्गुल्गाड्या पासून ते तारुण्यातील आराम खुर्ची  पर्यंत म्हातर पनातील  हातातील          कठीपासून ते साम्शानातील लाकडापर्यंत साथ देते .
१० )बहारलेल्या एका झाडावर जवळजवळ १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात .त्याच्या वर त्याच्या साधारण २५                 पिड्या जन्माला येतात .मधमाशांचे पोळे झाडावरती असल्यास हीच संख्या लाखाच्या घरात जाऊ शकते .
११ )प्रत्येक ८ मन या प्रमाणात २५ ते ३० माणसांचा  अंतिम संस्कार जलन करू शकते .
१२ )५० किलो मातीमध्ये पाला पाचोळा ची भर पडून जमिनिचा  कस  सुधारतो .
१३ १८ लाख  रुपयांच्या किमतीची जमिनीची धूप थांबते .
     या सोबतच झाडे  फळ फुले  सावली बराच काही देवून जातात .
       ५० वर्षात झाड काय करते व आपण माणसे ५० वर्षात काय करतो  याचा  लेखा  जोख या वरून तरी प्रत्येकाने            यावर विचार करावा .आपण माणसाने याच ५० वर्षात फक्त पर्यावरणाचा  नाश  केला 
        मानव निसर्गापासून दूर गेल्याने हे मुख्यता घडते आहे .त्यामुळे जैव्विव्धेतेचा  नाश पावत आहे 
! जागे व्हा ! कोमेजते आहे  धरणी माय ! दुष्काळी  क्षेत्र  पसरवत आहे अपले पाय !











Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...